शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

त्रिपक्षीय करार झाल्याशिवाय धुराडी पेटू देणार नाही : मजुरी ३७८ रुपये करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 17:00 IST

ऊस तोडणी मजूरांच्या मजुरी वाढीसह वाहतूक दरात वाढ करण्याबाबतचा त्रिपक्षीय करार होणार नाही, तोपर्यंत साखर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा ऊस तोडणी मजूर व वाहतूकदारांनी दिला.

ठळक मुद्देऊस तोडणी मजूरांचा इशारा कारखान्यांची धुराडी पेटू देणार नसल्याचे जाधव यांनी सांगितले.

कोल्हापूर : ऊस तोडणी मजूरांच्या मजुरी वाढीसह वाहतूक दरात वाढ करण्याबाबतचा त्रिपक्षीय करार होणार नाही, तोपर्यंत साखर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा ऊस तोडणी मजूर व वाहतूकदारांनी दिला.

ऊस तोडणी मजूरांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दसरा चौकातून निघालेला मोर्चा दुपारी एक वाजता सहसंचालक कार्यालयावर धडकला. यावेळी मागण्यांचे निवेदन प्रभारी प्रादेशिक उपसंचालक डी. एस. खांडेकर यांना देण्यात आले.

यावेळी महाराष्ट ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ. सुभाष जाधव म्हणाले, ऊस तोडणी व वाहतूकदारांच्या दरात वाढ करण्याची मागणी गेले वर्षभर आम्ही करत आहे. ऊस तोडणी यंत्राला टनाला चारशे रुपये दिले जाते आणि मजूराला २२८ रुपये हा कोणता न्याय, ही मजुरी किमान ३७८ रुपये करावी, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.

याबाबत २२ सप्टेंबरला राज्य साखर संघाच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली, ते सकारात्मक आहेत. पुढच्या बैठकीची वाट न पाहता मजुरीत वाढ केली पाहिजे. पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने ऊस वाहतूक परवडत नाही; त्यामुळे किमान ५० टक्के वाहतूक दरात वाढ करावी. स्थानिक ४० हजार, तर परजिल्ह्यातील ६० हजार, असे एक लाख ऊस तोडणी मजूर कोल्हापूर जिल्ह्यात असल्याचे जाधव यांनी सांगितले.

तोडणी व वाहतूक दरात वाढ झाल्याशिवाय विळा अथवा कोयत्याला हात घालायचा नाही. त्रिपक्षीय करार तोही तीन वर्षांचा केला पाहिजे, त्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू देणार नसल्याचे जाधव यांनी सांगितले. यावेळी प्रा. आबासाहेब चौगले, विलास दिंडे, दिनकर आदमापुरे, आनंदा डाफळे, बाबासो कुरुंदवाडे, आदी उपस्थित होते.गुरुवारी कारखान्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठकऊस तोडणी व वाहतूक दरवाढीबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांसमवेत गुरुवारी (दि. ४) दुपारी तीन वाजता साखर सहसंचालक कार्यालयात बैठक आयोजित केली आहे. सांगली जिल्ह्यातील कारखान्यांसमवेत शुक्रवारी (दि. ५) बैठक आहे.या आहेत मागण्या :ऊस तोडणीच्या दरात ४०, तर वाहतुकीच्या दरात ५0 टक्के वाढ करा.मुकादमाचे कमिशन दर २० टक्के करा.माथाडी बोर्डात तातडीने नोंदणी करा.मजूर व बैलजोडीचा विमा लागू करा. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर